
Mumbai city, Maharashtra
|TUE, OCT 08, 2019
नोटाबंदीच्या वार्ता पारीवर
८ नोव्हेंबरनंतर रोकड टंचाईमुळे ग्रामीण भारताला काय भोगावं लागलं – वाचा सगळ्या वार्ता एका ठिकाणी
Author
Translator
13. नोटाबंदीचं भूत - वर्ष झालं तरी मानगुटीवर
नोटाबंदीने झटका देऊन एक वर्ष झालं तरी अजूनही कर्नाटकातल्या लहान गावांमधल्या खानावळींवरच्या त्याच्या खुणा मिटलेल्या नाहीत
12. नोटाबंदीचं भूत
मराठवाड्याच्या गावांमध्ये, जिथे शेतीचे बहुतेक व्यवहार रोखीत होतात तिथे शेतकरी ८ नोव्हेंबरच्या नोटाबंदीच्या धक्क्यातून अजूनही सावरलेला नाही - कारण ठरतायत न वटलेले धनादेश, अपुऱ्या बँक सुविधा आणि ढासळत जाणारा शेतमालाचा भाव
11. नोटबंदीच्या फाश्यात फसलेल्या टोमॅटोचा जुगार
यंदाच्या हिवाळ्यात झालेल्या उदंड टोमॅटो उत्पादनात विदर्भातील भाजीपाला शेतकर्यांच्या प्रचंड आशा गुंतून होत्या. पण घसरत्या किंमतींसह ८ नोव्हेंबरच्या निश्चलनीकरणानंतर टोमॅटोंची चवच आंबट झाली
10. नोटबंदीने काढून घेतला नाशिकच्या टोमॅटोंचा सॉस
संपूर्ण देशात प्रत्येकी चार टोमॅटोंपैकी एक टोमॅटो जिथून जातो, त्या महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यात, ८ नोव्हेंबरच्या निश्चलनीकरणानंतर, सातत्याने पडत जाणार्या शेतमालाच्या किंमतींमुळे, शेतकरी मोठ्या प्रमाणावर टोमॅटोची उभीच्या उभी पिके नष्ट करत आहेत
9. नोटाबंदीच्या ‘दुष्काळाचा’ अर्धपोटी सामना
आंध्र प्रदेशातल्या बुचरलाची स्थलांतरित दलित कुटुंबं जेव्हा नोव्हेंबरमध्ये सणासाठी आपापल्या गावी परतली तेव्हा गावात रोकड टंचाई आणि कमी उत्पादनामुळे शेती संकटात होती, अर्थात त्यांच्या हाताला कामच नव्हतं – भर सणात अर्धपोटी राहण्याची वेळ आली त्यांच्यावर
8. ‘बीपीएल-अकरा’ - संघ जरी फिरता, पैसा मात्र नाही
नोटाबंदीमुळे मनीऑर्डर विस्कळित झाल्या आणि महाराष्ट्रातल्या स्थलांतरित कामगारांना त्यांच्या भुकेलेल्या कुटुंबांना पैसे पाठवणं अशक्य झालं . औरंगाबादच्या अडूळमध्ये पाच राज्यांतल्या कामगारांचा झगडा चालू आहे बँक व्यवस्थेशी, जी त्यांना समजतही नाही आणि जी त्यांच्यासाठी कामच करत नाही
7. नोटाबंदीमुळे काढला बिडी कारखान्यांचा धूर
नोटाबंदीनंतरच्या रोकड टंचाईमुळे पश्चिम बंगालच्या जांगीपूरमधले बहुतेक विडी कारखान्यांना टाळं लागलं आहे – परिणामी घरबसल्या विड्या वळणाऱ्या हजारो कामगारांचं – जास्त करुन महिलांची कमाईच बंद झाली आहे
6. बँकेची गांधीगिरी, मराठवाड्यातील रोखविरहित हारा-किरी
निश्चलनीकरणाच्या निराशेच्या गर्तेत खोल रूतत असतांना उस्मानाबादची बँक दोन साखर कारखान्यांकडून ३५२ करोड रूपये वसूल करण्यासाठी फारसे प्रयत्न करत नाही, मात्र त्याचवेळी २०,००० शेतकर्यांना १८० करोड रूपयांच्या कर्जासाठी सार्वजनिक अपमानाची भीती घालून धमकावत आहे
5. नेपाळी रुपये आले मदतीला
भारत-नेपाळ सीमेवरील उत्तराखंडातील नयनरम्य ओगला आणि जौलजीबी जत्रेतील व्यापारी नोटाबंदीमुळे फारच हैराण झाले आहेत तर सरहद्दीवरील शेवटचं शहर धारचूलामध्ये रोकडीची टंचाई दूर करण्यासाठी लोक नेपाळी रुपये वापरत आहेत
4. नोटाबंदी रिचवताना
आंध्रप्रदेशच्या ताडीमर्री गावातल्या खताच्या दुकानात केवळ जुन्या नोटा घेतल्या जातायत म्हणून दुष्काळग्रस्त भुईमूग शेतकरी त्यांचे उसने फेडण्यासाठी रांगा लावून उभे आहेत – आणि हाताला काम नसणाऱ्या शेतमजुरांनी नोटा बदलायचा अजून सोपा मार्ग शोधलाय, गावातल्या दारूच्या दुकानातून दारू विकत घ्यायची
3. नोटाबंदीने शेतकऱ्याची वाट लावलीये
हा खरं तर विदर्भातल्या कृषी बाजारांसाठी धामधुमीचा काळ असायला हवा. पण इथे मात्र शेतकऱ्यांना प्रचंड तोटा सहन करावा लागतो आहे – पाडलेले भाव, नाशवंत मालाची नुकसानी आणि जिथून कर्जं काढली आहेत त्या बँकांमध्ये जुन्या नोटांमध्ये पैसे भरावे लागण्याची भीती
2. थोडी नोटाबंदी आणि चिमूटभर कीटकनाशक मिसळलेलं एक कालवण
भारतातलं ८६ टक्के चलन सरकारने बेकायदेशीर ठरवलं तेव्हा तेलंगणच्या धर्मारम गावच्या वरदा बालय्यांचं कर्ज फेडण्यासाठी जमीन विकून पैसा उभा करण्याचं स्वप्न मातीमोल झालं. त्यांनी आत्महत्या केली आणि आपल्या कुटुंबालाही विष पाजलं.
1. चिकलठाण्यातली आर्थिक 'रोख' ठोकशाही
सरकारच्या निश्चलनीकरणाने शेतकरी, भूमिहीन मजूर, सेवानिवृत्त, किरकोळ व्यापारी आणि इतर अनेकजणांसह संपूर्ण महाराष्ट्र अतोनात त्रस्त झालेला आहे
Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]
Donate to PARI
All donors will be entitled to tax exemptions under Section-80G of the Income Tax Act. Please double check your email address before submitting.
PARI - People's Archive of Rural India
ruralindiaonline.org
https://ruralindiaonline.org/articles/नोटाबंदीच्या-वार्ता-पारीवर












