भारत सरकारच्या कृषी मंत्रालयाने दुष्काळ व्यवस्थापन पुस्तिका २०१६ आली आणि दुष्काळाची व्याख्या, मोजणी आणि घोषणा यामध्ये प्रचंड प्रमाणात बदल करण्यात आले. पीका (नुकसानीचे) अनुमान आणि दुष्काळाच्या मोजणीचा आता काही संबंध उरलेला नाही. आणि आता दुष्काळ जाहीर करण्याचा निर्णय जवळ जवळ राज्य सरकारकडे राहिलेलाच नाही – केंद्र सरकारने घालून दिलेल्या निकषांवरच आता ही घोषणा होणार.

उदाहरणार्थ, ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी महाराष्ट्रात ३५८ तालुक्यांपैकी १५१ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला, प्रत्यक्षात मात्र २०० हून अधिक तालुक्यांना दुष्काळाची झळ बसली आहे. पूर्वीपासून नुकसान भरपाईसाठी महत्त्वाचे मानलेले अनेक घटक (उदा. पिकलं नाही म्हणून शेतकऱ्याला दुबार किंवा तिबार पेरणी करावी लागली आहे का) आता महत्त्वाचे राहिलेले नाहीत. उपग्रहाद्वारे मिळणाऱ्या विदेला दिलेल्या महत्त्वामुळे – ज्यातून दुबार पेरणी कळतच नाही – हे शक्य झालं आहे.

असे अनेक आणि अतिशय गंभीर बदल करण्यात आले आहेत – आणि त्यातल्या बहुतेक सगळ्यांचा शेतकऱ्याला चांगलाच फटका बसणार आहे.

अनुवादः मेधा काळे

ಪಿ. ಸಾಯಿನಾಥ್ ಅವರು ಪೀಪಲ್ಸ್ ಆರ್ಕೈವ್ ಆಫ್ ರೂರಲ್ ಇಂಡಿಯಾದ ಸ್ಥಾಪಕ ಸಂಪಾದಕರು. ದಶಕಗಳಿಂದ ಗ್ರಾಮೀಣ ವರದಿಗಾರರಾಗಿರುವ ಅವರು 'ಎವೆರಿಬಡಿ ಲವ್ಸ್ ಎ ಗುಡ್ ಡ್ರಾಟ್' ಮತ್ತು 'ದಿ ಲಾಸ್ಟ್ ಹೀರೋಸ್: ಫೂಟ್ ಸೋಲ್ಜರ್ಸ್ ಆಫ್ ಇಂಡಿಯನ್ ಫ್ರೀಡಂ' ಎನ್ನುವ ಕೃತಿಗಳನ್ನು ರಚಿಸಿದ್ದಾರೆ.

Other stories by P. Sainath
Translator : Medha Kale

ಪುಣೆಯ ನಿವಾಸಿಯಾದ ಮೇಧ ಕಾಳೆ, ಮಹಿಳೆ ಮತ್ತು ಆರೋಗ್ಯವನ್ನು ಕುರಿತ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಸಕ್ರಿಯರಾಗಿದ್ದಾರೆ. ಇವರು ಪರಿಯ ಅನುವಾದಕರೂ ಹೌದು.

Other stories by Medha Kale