जंगलाच्या जवळ शेतात काम करणाऱ्यांवर वन्यप्राण्यांचे हल्ले आणि त्यातून येणाऱ्या गंभीर दुखापती आणि मृत्यूंचं प्रमाण वाढलं आहे. शेतमालांच्या हमीभावातले चढउतार आणि वातावरणाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्याचं जगणं आधीच मुश्किल झालं आहे. एकीकडे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचं यश दुणावत असताना शेतकऱ्यांसाठी मात्र वन्यजीवांसोबतचा जीवघेणा संघर्ष तीव्र होत चालला आहे