“जी २० परिषदेसाठी आलेल्या जगभरातल्या नेत्यांच्या स्वागतासाठी दिल्ली उजळून निघाली पण दिल्लीतल्या परिघावरच्या लोकांना मात्र सगळ्यांच्या नजरेपासून दूर करण्यात आलं. विस्थापित झालेले शेतकरी आता यमुना पूरग्रस्त बनले आहेत. त्यांना नदीकाठच्या जंगलांमध्ये पाठवून देण्यात आलं आहे. गीता कॉलनी उड्डाणपुलाखाली उभारलेल्या तात्पुरत्या निवाऱ्यांमधून हुसकून लावून त्यांना पुझचे तीन दिवस कुणाच्या नजरेस पडू नका अशी तंबी देण्यात आली आहे.”
“आमच्यापैकी काही जणांना पोलिस जबरदस्तीने पकडून नेलं. फक्त १५ मिनिटांत आम्हाला जायला सांगण्यात आलंय नाही तर ते बळाचा वापर करून जबरदस्तीने आम्हाला तिथून हलवतील असं ते म्हणाले,” हिरालाल यांनी पारीला सांगितलं.
या जंगल भागामध्ये साप आहेत, विंचू आहेत गवत इतकं माजलंय की इतरही गोष्टींचा धोका आहे. “आमच्याकडे ना वीज ना पाणी. जर कुणाला काही किरडू चावलं तर इथे कसला दवाखाना वगैरेही नाही,” कधी काळी फार जीव लावून शेती करणारे हिरालाल म्हणतात.

















