समुद्राच्या किनाऱ्यावरून लाकडी सांगाड्याच्या मदतीने चालवण्यात येणाऱ्या जाळ्यांवर केरळच्या कोचीमधल्या अनेकांचं पोट भरत होतं. याच जाळ्यांना चायनीज जाळी देखील म्हटलं जातं.
पण अनेक स्थित्यंतरांनंतर या उद्योगाला अवकळा आली आहे. पर्यावरण आणि अर्थकारण, दोन्ही दृष्टीने. फोर्ट कोचीच्या आसपास खोल समुद्रातल्या ट्रॉलर्समुळे तसंच औद्योगिक प्रदूषणामुळे मासळी कमी व्हायला लागली आहे. जी काही मासळी घावते त्याचा नफा मध्यस्थांच्या खिशात जातो आणि मच्छीमारांना मात्र अगदी तुटपुंजा नफा हाती येतो.




