काही वर्षांपूर्वी कालीने कलाक्षेत्राबद्दल ऐकलेही नव्हते. सारा चांद यांनी कोवालमच्या 'त्सुनामी पुनर्वसन केंद्रात' त्याचे नृत्य पाहिले आणि त्याच्यातील कलेला ओळखले. त्यांनी त्याला सांगितले, की त्याने कलाक्षेत्र येथे रीतसर या कलेचे शिक्षण घ्यावे. यावर त्याच्या दूर-दूरच्या नातेवाईकांनी त्याला नाउमेद केले; पण त्यावर मात करून तो मुलाखतीत पास झाला आणि त्याला प्रवेश मिळाला. त्याने हे अडथळे पार केले असले, तरी पुढे काही अजून काही अडथळे उभे ठाकणार होतेच.
भरतनाट्यम आणि शास्त्रीय संगीताचा गंधही नसलेल्या, 'तामिळ शाळेत शिकलेल्या' या मुलाला कलाक्षेत्र सुरुवातीला फार अवघड वाटलं होतं. तिथले अन्न काटेकोरपणे शाकाहारी असायचे, त्यामुळे त्याच्या पूर्वीच्या मांसाहाराची त्याला कमी वाटू लागली. त्याची प्रकृती कृशः झाली होती. पण तो जेंव्हा लट्ठ होता तेंव्हा त्याचा नाच कसा दिसायचा हे त्याने हसत-हसत दाखवलं. तिथल्या अनेक विदेशी लोकांपेक्षा तो चांगलं नृत्य करू शकत असे. त्याला तिथली संस्कृती तितकीच अनभिज्ञ होती, जितकी इतरांना, आणि त्याला इंग्लिश बोलणंही जमायचं नाही, त्याचा त्याला त्रास व्हायचा.
त्यावर त्याने नृत्यातूनच तोडगा काढला! तो शब्दांऐवजी हावभाव वापरू लागला आणि त्याने त्याच्या बुजरेपणावर मात केली. त्याहीपुढे जाऊन त्याने रशियन आणि दक्षिण आफ्रिकेतील मुलींना जमवून 'प्रथम वर्षीय विद्यार्थी दिन' ला ओयीलाट्टम सादर केलं. कलाक्षेत्राच्या डायरेक्टर लीला सामसन यांना त्याचे प्रयत्न आवडले. तो वर्गातही प्रथम आला. अशाप्रकारे त्याचा आत्मविश्वास आणि त्याचे ज्ञान दिवसेंदिवस वाढू लागले.
आता तो एका क्षणात राग ओळखू शकतो. कलाक्षेत्राच्या संस्थापिका आणि डायरेक्टर रुक्मिणीदेवी अरुन्दले यांच्यापासून नावाला आलेल्या 'रुक्मिणी अरंगम' या नावाजलेल्या कार्यक्रमात तो राग ओळखतो आणि त्याच्या मित्रांना तो चूक आहे, की बरोबर हे विचारतो. बहुतेक वेळेस तो बरोबरच असतो. आता त्याचे नृत्य पूर्वीपेक्षा फारच सुधारलेले आहे त्याच्या स्टेप्स आणि हावभाव नेमके असत्तात.