दिनकर ऐवळेंसाठी यंदाचं वर्ष मुक्यागत गेलंय, कितीक महिने झाले त्यांच्या बासऱ्यांमधून सूरच उमटले नाहीयेत. “या वाद्याचा थेट तोंडाशीच संपर्क येतोय. सध्याच्या करोनाच्या काळात असा स्पर्श झाला तर लागण व्हायचा धोका असतोय,” आपल्या विटा-मातीच्या घरात बसलेले ऐवळे सांगतात.
त्यांच्या बाजूलाच एक लाकडी संदूक आहे जिच्यात चिकार अवाजरं आहेत. मागच्या वर्षीपर्यंत जशी त्यांची कामाची पद्धत होती त्याप्रमाणे ही अवजारं वापरून पलिकडच्या कोपऱ्यातले वेळूचे शेंडे कोरून त्याची बासरी करण्यासाठी त्यांना तासभरही लागणार नाही.
ते तर दूरच, आम्ही बोलतो होतो तेव्हा ७४ वर्षीय ऐवळेंची नजर त्या निर्जीव बांबूकडे लागून राहिली होती. मार्च २०२० मध्ये टाळेबंदी लागली आणि तेव्हापासून त्यांचं काम पूर्ण ठप्पच झालंय म्हणा ना. त्या आधी पन्नास वर्षांहून अधिक काळ वर्षातले २५०-२७५ दिवस, दिवसाला १० तास – तब्बल दीड लाख तास त्यांनी केवळ आपली कला समृद्ध करण्याच घालवलेत.
वयाच्या १९ व्या वर्षी ऐवळेंनी बासऱ्या बनवायला सुरुवात केली, तेव्हापासून त्यांनी इतका काळ सलग कधीच त्यांचं काम थांबवलेलं नाही. इतकंच नाही गेल्या वर्षभरात महाराष्ट्र आणि कर्नाटकातल्या गावांमध्ये जत्रांमध्ये बासऱ्या विकण्यासाठी शेकडो किलोमीटर पालथे घालतात तेही यंदा नाही. कारण मोठ्या जत्रांना अजूनही परवानगी मिळालेली नाही.












