'या पुराने आमच्या नाका-तोंडात गाळ भरलाय असं वाटू लागलंय'
ऑगस्ट महिन्यात झालेल्या पावसाने अदिलाबाद जिल्ह्यात कपाशीचं पीक उद्ध्वस्त केलं. पहिल्यांदाच शेती करणारे दलित शेतकरी यात होते ज्यांना विम्याचा कसलाही आधार नव्हता आणि डोक्यावर कर्जाचा बोजा होता. पुढचं पीक तरी चांगलं येईल या आणि नुकसान भरपाईच्या आशेवर आहेत