पंजाबातल्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की राज्यभरातलं मंडी किंवा बाजारसमित्यांचं प्रचंड जाळं म्हणजे त्यांच्यासाठी सुरक्षा कवच आहे. पिकाला हमीभाव आणि इतर अनेक प्रकारचं सहकार्य देणारी ही यंत्रणा आता नव्या कृषी कायद्यांमुळे मोडीत निघेल अशी त्यांना भीती वाटतीये