भारताच्या स्वातंत्र्याचा लढा सुरू होता आणि त्या संघर्षमय काळात अनेक दशकं भबानी महातो नेटाने आणि धीराने घर सांभाळत होत्या, शेती करत होत्या, अन्न रांधत होत्या, घरच्यांना आणि अनेक क्रांतीकारकांना जेवू घालत होत्या. आज वयाच्या तब्बल १०६ व्यी वर्षी देखील त्यांचा लढा सुरूच आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतही त्यांनी आपला मत दिलंय