
SANGUR, PUNJAB
|FRI, AUG 10, 2018
होरपळलेली आणि तहानलेली गावं
गावाकडची पाणी टंचाई अनेक नैसर्गिक आणि मानवी घटकांमुळे वाढत चालली आहे – कमी पाऊस, दुष्काळ, खालावत जाणारी भूजलाची पातळी आणि सोबतच यासंबंधीची धोरणं, अपुरं सिंचन, मोठी धरणं, कूपनलिका, पाण्याचं असमान वाटप आणि मोठ्या प्रमाणावर वंचन. पाण्याच्या दुर्भिक्ष्यामुळे पिकं वाळत चालली आहेत, कर्जबाजारीपणा वाढू लागलाय, कित्येकांना स्थलांतर करावं लागतंय आणि आजारपणांमध्ये भर पडतीये. काही काळातच संपूर्ण देशासमोरचं एक मोठं संकट होऊ घातलेल्या या अभूतपूर्व अशा पाणी संकटाबद्दल पारीवर सादर झालेल्या या काही कहाण्या
Author
Translator
22. ‘साफ पाण्याची चैन आम्हाला परवडत नाय’
मागच्या वर्षीचा अपुरा पाऊस आणि दीर्घकालीन कारणांमुळे या वर्षाच्या सुरुवातीलाच गाळतऱ्यातले पाण्याचे स्रोत आटले, परिणामी पालघर जिल्ह्यातल्या या गावच्या बायांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी रोज २५ किलोमीटर पायपीट करावी लागत आहे
21. एकाकी गावचा म्हातारा
एस. कंदासामी तमिळ नाडूच्या थूथुकोडी जिल्ह्यातल्या मीनाक्षीपुरम गावाचे एकमेव रहिवासी आहेत – अगदी आठ वर्षांपूर्वी या गावाची लोकसंख्या १,१३५ होती. पण इथल्या भीषण पाणी टंचाईमुळे सगळे जण इथून निघून गेले
20. प्रह्लादासमोरील यक्षप्रश्न : गाई की पेरू?
मराठवाड्यातील वाढत्या दुष्काळाने तिथल्या बऱ्या परिस्थितीतल्या शेतकऱ्यांना देखील तगून राहणं कठीण जातंय. शेतीसाठी आणि गुरांसाठी पाणी विकत घ्यायचं आणि पैसे संपले की सारं सोडून द्यायचं. बीड जिल्ह्यातील अनेकांची हीच स्थिती आहे
19. मंड्याची निवडणूकः शेतकऱ्यांसाठी ना पाणी ना आशा
मतदानाला केवळ २४ तास राहिलेत आणि कर्नाटकातल्या मंड्या जिल्ह्यातले शेतकरी कदाचित मोठ्या संख्येने मतदानही करतील पण कोणत्याच मोठ्या राजकीय पक्षाने दिलेल्या शब्दावर त्यांचा विश्वास नाहीये
18. मराठवाड्याचं अशांत पाणी हाडं करतंय खिळखिळी
मराठवाड्यातल्या सततच्या दुष्काळामुळे सावरखेडसारख्या अनेक गावातल्या लोकांना जास्त प्रमाणात फ्लुरॉइड असलेलं बोअरवेलचं पाणी प्यायला लागत आहे, आणि यामुळे अनेकांना विकलांग करणाऱ्या फ्लुरोसिसची बाधा झाली आहे
17. पाण्याच्या आठवणी
सातत्याने कमी होत जाणारा पाऊस, जास्त पाणी लागणाऱ्या पिकांची लागवड आणि वाढतच चाललेल्या बोअर वेल या सर्वांमुळे अनंतपूर जिल्ह्यातल्या नागरूरची भूजलाची पातळी खालावत चालली आहे, आणि आपली पिकं वाचवण्यासाठी शेतकऱ्यांच्या नाकी नऊ आले आहेत
16. दुष्काळ – जीवन आणि मृत्यू यांच्यातील संघर्ष
तमिळनाडूमधील तयनूर गावातील शेतकरी सध्या दुष्काळाहूनही कठिण परिस्थितीचा सामना करीत आहेत. दिवसेंदिवस वाढतच जाणाऱ्या दुष्काळामुळे कावेरीच्या खोऱ्यात राहणाऱ्या अनेक शेतकऱ्यांनी जीव गमावला आहे.
15. ‘१०० दिवस’ काम – दुष्काळाशी वयोवृद्धांचे दोन हात
तमिळनाडूच्या कधी काळी सुपीक असणाऱ्या कावेरी खोऱ्यातल्या प्रदीर्घ आणि गंभीर दुष्काळाने शेतीची वाताहत झाली आहे. अनेक गावात तरुण कामाच्या शोधात गावं सोडून गेलेत आणि म्हातारे-कोतारे काही तरी कमाई होईल म्हणून अंगमेहनतीची काम करत करत आहेत
14. कावेरीच्या खोऱ्यातला तणाव आणि मृत्यू
तमिळ नाडूच्या कावेरी खोऱ्यातल्या प्रदीर्घ दुष्काळामुळे हृदयविकाराच्या झटक्याने किती तरी शेतकऱ्यांचा जीव गेला आहे. यासाठी कृषी संकट जबाबदार आहे हे शासनाने फेटाळून लावलं असलं तरी अनेक कुटुंबांच्या कहाण्या वेगळंच काही सांगतायत.
13. ‘पाणी आम्हाला नाय, तुम्हाला मिळतं’
पालघर जिल्ह्यातल्या किल्लाबंदर गावातल्या मुली आणि बायांचे तास न् तास विहिराच्या बुडाशी असलेलं पाणी गोळा करण्यात जातात. त्यांचं पाणी मुंबईला जातं याबद्दलचा त्यांचा राग लपत नाही
12. ‘इतक्या गरमीतही पाणी प्यायलं तर माझं मन मला खातं...’
लातूरच्या काशीराम सोमला तांड्यावरच्या शालुबाई चव्हाणांचे दिवसाचे आठ तास घरच्यासाठी पाणी भरण्यात जातात. काहींचे त्याहून कमी पण त्यांना पाण्यासाठी मोजावे लागणारे पैसे औरंगाबादच्या बीअर कारखान्यांपैक्षा तिपटीने जास्त आहेत. आणि बहुतेक वेळा हे जिकिरीचं काम बाया किंवा मुलीच करताना दिसतात. त्यासाठी त्यांच्या आरोग्याची फार मोठी किंमत त्यांना मोजावी लागतीये
11. दुःखाच्या खोल विहिरी
मराठवाड्याच्या उस्मानाबाद जिल्ह्यात उन्हाळ्याच्या तलखीत विंधनविहिरींची अनियंत्रित अर्थव्यवस्था सध्या तेजीत आहे. कितीही खोल आणि कितीही किंमत देऊन पाणी मिळवण्यासाठी शेतकरी हातघाईवर आले आहेत. याचाच फायदा बोअरमालक आणि त्यांचे दलाल उठवत आहेत
10. विहीर खोदता खोदता कर्जाच्या खाईत
अर्ध्यावर सोडलेली, मलबा पडलेली आपल्या शेतातली विहीर बघताना औरंगाबाद जिल्ह्यातल्या गणोरी गावातल्या कारभारी जाधवांना रोज आठवत राहतं, झालेलं नुकसान – घेतलेलं कर्ज, गहाण ठेवलेली शेतजमीन, वाढते व्याजदर, मजुरीचा खर्च आणि खर्चलेला वेळ. हे सारं कशामुळे झालं? सरकारी कार्यालयात चकरा मारल्या, पैसा चारला तरीही अजून त्यांना विहिरीसाठीचे अनुदान मिळालेलेच नाही
9. छिन्नी हातोड्याचे घाव - वसई किल्ल्यावरच्या वडारांची कहाणी
पिढीजात व्यवसाय म्हणून दगड घडवणारे महाराष्ट्रातले वडार (पाथरवट) जुन्या वास्तूंच्या जीर्णोद्धारासाठी देशभर फिरत असतात. बहुतेकांना दुष्काळामुळे शेतीतून बाहेर पडावं लागलंय. मुंबईच्या उत्तरेला असणाऱ्या वसई किल्ल्यावर त्यांच्याशी गप्पा मारताना जाणवते त्यांची अंग पिळवटून टाकणारी मेहनत आणि एक अपार दुःख
8. पवित्र पाणी टँकरचं
महाराष्ट्रावरचं पाण्याचं संकट टळलेलं नाही, पावसाच्या आगमनानंतर माध्यमांमधून ते गायब झालं असलं तरीही
7. गोष्ट फुल्यांच्या घराची आणि रया गेलेल्या गावाची
सातारा जिल्ह्यातलं काटगुण गाव. जोतिबा फुल्यांचं घर असणाऱ्या या गावाला आज ज्ञानाची, शिक्षणाची आणि न्यायाची आस लागलेली नाही. आहे ती फक्त पाण्याची तहान
6. उगम नद्यांचे, ‘उद्योग’खोरी राज्यकर्त्यांची
महाराष्ट्रात पाण्यासारखा पैसा येऊनही नद्या मात्र कोरड्या ठाक पडल्यायत: कृष्णाकाठचा एक प्रवास
5. तहानेच्या अर्थकारणात जमिनीची चाळण
महाराष्ट्रात बोअरवेल खोल खोल चालल्या आहेत. काही ठिकाणी तर त्या थेट पुराश्मकालीन पाण्याच्या साठ्यांपर्यंत पोचल्याच्या चिंताजनक घटना घडत आहेत.
4. पाण्याचं गहिरं संकट
देशभरातून असलेली प्रचंड मागणी तमिळनाडूचे बोअर यंत्रचालक पुरी करत आहेत, अर्थात भूगर्भातल्या पाणी साठ्यांवर मात्र याचे गंभीर परिणाम होणार आहेत.
3. जेव्हा पाणी पैशासारखं वाहतं...
उस्मानाबादमध्ये एकीकडे दुष्काळामुळे किती तरी जण जगण्यासाठी धडपडत आहेत तर दुसरीकडे या टंचाईमुळे काही धंद्यांची भरभराट होत आहे
1. असा सुकत चाललाय निम्मा महाराष्ट्र...
पाणी शोषून घेणारी पिकं, वॉटर पार्क्स, आरामशीर स्विमिंग पूल – या सगळ्यांचा संबंध महाराष्ट्राच्या आटत चाललेल्या नद्या आणि जलाशयांशी आहे. पाण्याच्या नाड्या कुणाच्या हातात हा प्रश्न आता अधिकच महत्त्वाचा बनत चालला आहे
Want to republish this article? Please write to [email protected] with a cc to [email protected]
Donate to PARI
All donors will be entitled to tax exemptions under Section-80G of the Income Tax Act. Please double check your email address before submitting.
PARI - People's Archive of Rural India
ruralindiaonline.org
https://ruralindiaonline.org/articles/होरपळलेली-आणि-तहानलेली-गावं




















