आपल्या शेताबद्दल बोलताना शैलेंद्र बाजरेंचा चेहरा काळवंडून जातो. गेली १५ वर्षं त्यांनी शेतात काहीही पिकवलेलं नाही. “सगळं त्या कचरा डेपोमुळे झालंय – सगळं विषारी पाणी जमिनीच्या पाण्यात मिसळलंय. बोअरचं पाणीदेखील खराब आहे. शेतीसाठी ते वापरता येत नाही. पिकं पण खराब होणार आणि जमीनदेखील,” ते सांगतात.
विजयता ललवाणी हिने सिम्बायोसिस सेंटर फॉर मीडिया कम्युनिकेशन, पुणे येथून २०१६ मध्ये पदवी घेतली आहे. ती आता पुणे ३६५ या वेब वार्तापत्रासाठी सहाय्यक मजकूर निर्माती म्हणून काम करते.
See more stories
Translator
Medha Kale
मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.