औरे पाल्हेरीः भग्न पूल, भंगलेल्या आशा

महाराष्ट्राच्या शहापूर तालुक्यातील आडवाटेच्या एका पाड्यात जाणारा पूल २००५ मध्ये पडला, तेव्हापासून पावसाळ्यात इथल्या रहिवाशांना शाळेत जाण्यासाठी, कामानिमित्त, तर कधी दवाखान्यात किंवा बाजारात जाण्यासाठी दररोज आपला जीव धोक्यात टाकावा लागत आहे

१६ सप्टेंबर| ज्योती शिनोळी

‘नदी पुन्हा संतापली तर?’

४ ऑगस्ट रोजी, तुडुंब भरून वाहणाऱ्या वैतरणा नदीनं महाराष्ट्रातल्या पालघर जिल्ह्यातील कातकरी आदिवासींची घरं उद्ध्वस्त केली. संपत चाललेलं अन्नधान्य, राज्य शासनाची असमान मदत आणि आणखी एखाद्या पुराच्या भितीनं गावकरी अस्वस्थ आहेत

१६ सप्टेंबर २०१९ | ज्योती शिनोळी

भेंडवड्याचा मुकाबला कोल्हापुराच्या पुराशी

महाराष्ट्राच्या सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंत ४० जणांचा जीव गेला आहे, चार लाखाहून अधिक जणांना तात्पुरत्या शिबिरांमध्ये हलवण्यात आलंय, पशुधन आणि पिकाचं अतोनात नुकसान झालंय, ज्याची अजून मोजदाद व्हायची आहे

१७ सप्टेंबर २०१९| संकेत जैन

'या पुराने आमच्या नाका-तोंडात गाळ भरलाय असं वाटू लागलंय'

ऑगस्ट महिन्यात झालेल्या पावसाने अदिलाबाद जिल्ह्यात कपाशीचं पीक उद्ध्वस्त केलं. पहिल्यांदाच शेती करणारे दलित शेतकरी यात होते ज्यांना विम्याचा कसलाही आधार नव्हता आणि डोक्यावर कर्जाचा बोजा होता. पुढचं पीक तरी चांगलं येईल या आणि नुकसान भरपाईच्या आशेवर आहेत

११ फेब्रुवारी २०१९| हरिनाथ राव नागुलवंचा

बुडाल्यात जमा एका बँकेची गोष्ट

केरळमध्ये महापूर येऊन गेला आणि अगणित कागदपत्रं आणि महत्त्वाचा दस्तावेज शोधून तो नीट जपून ठेवण्याचं आणि साफसफाईचं मोलाचं काम आता सुरू आहे. अन्यथा आगामी काळात अनेक कामं ठप्प होऊ शकतात

२२ जानेवारी २०२०| पी. साईनाथ

पुरालाही लाजवणाऱ्या केरळच्या महिला शेतकरी

त्यांच्या निर्धारापुढे झालेलं नुकसानही कमी वाटू लागतं. ऑगस्ट महिन्यातल्या पुरांनी उद्ध्वस्त झाल्यावरही, दुष्काळाचं संकट समोर दिसत असतानाही कुटुंबश्रीची पथदर्शी समूह शेती एकीच्या बळावर परत एकदा जोर धरतीये

१ ऑक्टोबर २०१८| पी. साईनाथ

‘हळू हळू पाणी चढू लागलं’

केरळमध्ये नुकत्याच येऊन गेलेल्या महापुरानंतर अळप्पुळा जिल्ह्यातल्या एका मदत शिबिरात मुलांना चित्र काढायला आणि लिहायला पेन आणि रंगीत खडू दिले होते. त्यांच्या मनातली भीती आणि प्रार्थना, त्यांनी काय गमावलं आणि त्यांची सुटका हे सगळं त्यांच्या चित्रांमधून आणि शब्दांतून व्यक्त होतं

१४ सप्टेंबर २०१८ | व्ही. शशीकुमार

‘आमची घरं नाहिशी होतायत. कुणालाच फिकीर नाही’

कित्येक दशकांपासून संदुरबनच्या घोरामारा बेटावरचे लोक सागर बेटावर स्थलांतर करतायत कारण नदी आणि पाऊस त्यांची घरं धुऊन नेतायत. राज्य सरकारकडून त्याना फारशी मदत मिळालेली नाही

२२ सप्टेंबर २०१९| ऊर्वशी सरकार

पोलावरमच्या वंचितांची आशावादी आगेकूच

१० ते १६ जुलै दरम्यान आदिवासींच्या एका निश्चयी गटाने, त्यांच्या जमातींना विस्थापित आणि बेचिराख करणाऱ्या पोलावरम प्रकल्पाविरुद्ध, पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील चीरावल्ली गावापासून एळूरूपर्यंत मोर्चा काढला

२८ ऑगस्ट २०१८| राहुल मगंती

पायडिपाकाची कुटुंबं – आणि अखेर राहिले दहा

गोदावरीवरच्या पोलावरम प्रकल्पामुळे येत्या काळात शेकडो गावं नामशेष होणार आहेत. पायडिपाकामधली दहा घरं मात्र तिथून हलायला तयार नाहीत, शासनाने कायद्याप्रमाणे त्यांना पुनर्वसनाचं पॅकेज द्यावं अशी त्यांची मागणी आहे

२७ ऑगस्ट २०१८| राहुल मगंती

दिरंगाईच्या पुरात, नुकसान आणि कर्जाच्या गाळात

गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात इटुकुलकोटामधल्या अनेक आदिवासी कुटुंबांची पिकं आणि घरं पोलावरम कालव्याच्या पाण्यात वाहून गेली. कोणत्याही शासकीय मदतीअभावी ते अजूनही त्यातून सावरलेले नाहीत

२५ मे २०१८| राहुल मगंती

‘अनेक कुटुंबं तर गायबच झाली...’

ठाणे जिल्ह्यातल्या भातसा सिंचन प्रकल्पासाठी आदिवासी आणि बहुजन कुटुंबांना त्यांच्या जमिनींवरून हाकलून लावण्यात आलं. अर्धं शतक लोटलं तरी आजही ते न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत

८ ऑगस्ट २०१८| ज्योती शिनोळी

धुबरीचे बांबू कारागीर

आसाममधील ब्रह्मपुत्रेच्या कुंतीर बेटांवरचा मैनुद्दिन प्रामाणिक रोज बांबूच्या पट्ट्या बनवण्यासाठी धुबरी शहरात येतो. पण या व्यवसायाला उतरती कळा आली आहे आणि कामगारांपुढे कामाचे इतर फार थोडे पर्याय उपलब्ध आहेत

६ फेब्रुवारी २०१८| रत्ना भराली तालुकदार

नदीकिनारी सारे अशांत

नव्या ‘अमरावती’ आणि विजयवाड्याच्या आसपास नदीकिनारी उभ्या राहत असलेल्या राज्य सरकारच्या प्रकल्पांसाठी आंध्र प्रदेशातील कृष्णेकाठच्या मच्छिमारांना जबरदस्तीने आपली घरं आणि उपजीविका सोडून जायला भाग पाडलं जात आहे

१८ डिसेंबर २०१९| राहुल मगंती

दूध भरून आणणाऱ्या चार बेटांवरच्या नावा

आसामच्या ब्रह्मपुत्रेतल्या चालाकुरा बेटावर राहणाऱ्या लोकांसाठी दुग्ध व्यवसाय हाच उपजीविकेचा मार्ग आहे – पण वैरण आणि पशुखाद्याचं सरकारी अनुदान काढून टाकल्यामुळे त्यांची आयुष्यातील अनिश्चितता वाढली आहे

१३ फेब्रुवारी २०१८| रत्ना भराली तालुकदार

चारवरची सौर ऊर्जा

गेल्या काही वर्षांत बिरसिंगच्या 'चार' बेटांवरच्या काही गावांमध्ये सौर ऊर्जा आलीये आणि त्यामुळे आसाममधल्या ब्रह्मपुत्राच्या या वाळूंच्या बेटांवर प्राथमिक आरोग्याच्या सुविधा आणि इतर दैनंदिन कामांमध्ये मोठा बदल घडून आला आहे

२२ जानेवारी २०२०| रत्ना भराली तालुकदार

जेव्हा नदीने शाळा खाऊन टाकली

आसामच्या सोनताली चारमधल्या पानिखाइती गावातली एकमेव शाळा ब्रह्मपुत्रेत गायब झालीये. शाळेतल्या १९८ विद्यार्थ्यांपैकी फक्त ८५ जण मुख्याध्यापक तारिक अलींच्या घरी भरणाऱ्या तात्पुरत्या शाळेत जातायत

२१ सप्टेंबर २०१९| रत्ना भराली तालुकदार

नदीपासून ताटापर्यंत सुंदरबनच्या समुद्री कोळंबींचा प्रवास

पुरवठा साखळीत इतरांना चांगला भाव मिळवून देणारा स्वादिष्ट पदार्थ - समुद्री कोळंबीचे अंकुर एकत्रित करणे, सुंदरवनमधील ग्रामीण महिलांसाठी एक असंतोषजनक आणि नावडते काम आहे

१८ जानेवारी २०१७| ऊर्वशी सरकार

वाळूचा किल्ला,‘चार’-निवासींचा संघर्ष

ब्रह्मपुत्रेच्या सरकत्या, अस्थिर, वाळूमय ‘चार’वर, वीज, आरोग्य सेवा किंवा इतर मूलभूत गरजांशिवाय, घर उभारून राहणार्या २.४ लाख लोकांपैकी, हसन अली एक आहेत. अफाट ब्रह्मपुत्रेतील सततच्या उलथापालथीमुळे त्यांना वारंवार घर बदलावे लागते

२६ जानेवारी २०१७| रत्ना भराली तालुकदार

पाणी येतं, पाणी जातं

बिहारच्या उत्तरेकडे लोक पाऊस आणि नद्यांना मानत असत, कधीमधी त्यांच्यामुळे पूर येत असले तरी. पण आता मात्र, सेनू देवी म्हणते तसं वाढत चाललेलं पाणी म्हणजे संकटाचा सांगावा

१० जानेवारी २०२०| सायंतिनी पालचौधरी

पुरासोबत जगणं

जगभरातले अनेक शेतकरी कमी पाण्यात निभवायला शिकतायत तर उत्तर बिहारमधले विनोद यादव आणि त्यांचे शेजारी सातत्याने येणाऱ्या पुराच्या पाण्यावर शेती करण्याच्या प्रयत्नात आहेत

२२ जानेवारी २०२०| सायंतिनी पालचौधरी

जहांगीरची गोष्ट

उत्तर बिहारमध्ये रोरावत्या कोसीला सरकारने बांध घातले आणि त्याच्यामुळे संघर्ष सुरू झाला, पूर वाढले आणि घोंगेपूर व इतर गावातल्या रहिवाशांचं मोठं नुकसान झालं

१० जानेवारी २०२०| सायंतिनी पालचौधरी

ओडिशात स्थलांतर तेही पोहत

ओडिशाच्या जगतसिंगपूर जिल्ह्यात उन्हाळ्यात नव्या कुरणांच्या शोधात म्हशी दररोज गावातली नदी पोहून पार करतात

१० जानेवारी २०२०| दिलिप मोहंती

द्रुत लयीतली नावांची दुरुस्ती

केरळच्या आळप्पुळामध्ये अतिशय निष्णात असे कारागीर दुरुस्तीचं काम विलक्षण ठेक्यात करतायत

६ जानेवारी २०२०| व्ही. शशीकुमार

अधिकार मासेमारीचा, संघर्ष जगण्याचा

“आमच्या डोंग्या जप्त करून आमच्या पोटावर लाथ का मारताय?”

७ जानेवारी २०२०| ऊर्वशी सरकार

अनुवादः मेधा काळे

Translator : Medha Kale

Medha Kale is based in Pune and has worked in the field of women and health. She is the Translations Editor, Marathi, at the People’s Archive of Rural India.

Other stories by Medha Kale